अण्णासाहेब दराडे यांनी केला रामतीर्थ तांड्यावरून प्रचाराचा शुभारंभ ; आता ' बॅट ' तालुकाभर घुमणार !
News धाराशिव आवाज दिं.५ नोव्हेंबर
शेतकरी पुत्र म्हणून तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरलेले परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (दि.५) मोठ्या उत्साहात व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथून नारळ फोडून सुरुवात केली. तांड्यावरून नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करणारे अण्णासाहेब दराडे हे महाराष्ट्रातील पहिले उमेदवार असतील. ज्यांनी तांड्यावरती जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या लोकांसमवेतच आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
मंगळवारी दि. 5 नोव्हेंबर रोजी परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार व शेतकरी पुत्र म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अण्णासाहेब दराडे यांनी रामतीर्थ तांडा येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला.यावेळी रामतीर्थ तांडा तसेच परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधतेवेळी अण्णासाहेब दराडे यांनी भाजप तसेच काँग्रेस वर हल्लाबोल चढवला. जातींची वेगवेगळी वाटणी करून निवडणूक काळात मतदान घेतले जाते.राजकारणी प्रत्येक जातीतील एक माणूस सोबत घेऊन त्याचा चेहरा त्या त्या जातीतील लोकांना दाखवून मतदान ओढण्याचा केविलोना प्रयत्न करतात हे खऱ्या अर्थाने दुर्भाग्य आहे.अशी खंत अण्णासाहेब दराडे यांनी बोलताना व्यक्त केली. मागील दहा वर्षात जितके नारळ मोदी साहेबांनी फोडले नसतील त्यापेक्षा जास्त नारळ मागील दोन महिन्यात आमदारांनी फोडले पण ही काम पुढील पन्नास वर्षांत तरी होतील का हा प्रश्नच असल्याचे सांगितले..?