पाडोळी व परिसरातील मातंग समाजाच्या शेकडो युवकांनी आमदार राणा पाटील यांना पाठींबा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश
News धाराशिव आवाज दि.२०( धाराशिव)
मागील अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने मातंग समाजासाठी महत्त्वाचे व जिव्हाळ्याचे असणारे अनेक विषय सोडवले आहेत. त्यामुळे समाजाची उन्नती होण्यास मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. गेली अनेक वर्षांपासून मातंग समाज राजकीय, आर्थिक व सामाजिक इतर बाबींमध्ये मागे होता त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महायुती सरकारने हिताचे निर्णय घेतले आहेत.आपल्या विकासाच्या मुद्यावर विश्वास ठेऊन पाडोळी व परिसरातील असंख्य युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
प्रवेश करणार्यांमध्ये प्रामुख्याने श्री.शंकर कांबळे, श्री.स्वप्नील देडे, श्री.आशिष कांबळे, श्री.नामदेव गायकवाड, श्री.रमेश तुपे, श्री.अनिल कांबळे, श्री.अजित सरडे, श्री.ऋषी कटाळे, श्री.विजय कांबळे, श्री.प्रशांत कांबळे, श्री.बिभीषण मिसाळ, श्री.महेश कांबळे, श्री.बालाजी चौरे, श्री.विलास चौरे, श्री.रवी आदरराव, श्री.खंडू कांबळे, श्री.ईश्वर कांबळे, श्री.सोमनाथ कांबळे श्री.कुंडलिक मिसाळ, श्री.निशिकांत शिंदे, श्री.राजू कांबळे यांच्यासह अनेक युवकांनी प्रवेश केला.
प्रवेश केलेल्या युवकांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आश्वासन दिले. युवकांनी प्रवेश करून केवळ स्वस्थ बसू नये तर जनसामान्यांच्या अडीअडचणी घेऊन सातत्याने माझ्या संपर्कात राहावे व लोकांची कामे करावीत असे आवाहन केले. या प्रवेशासाठी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस श्री.सचिन लोंढे यांनी पुढाकार घेतला..
श्री.शंकर कांबळे यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचीत जाती मोर्चा धाराशिव तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..
यावेळी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.अमोल पेठे, श्री.सुरज लोंढे उपस्थित होते.