डिसेंबरमध्ये पाणी सोडणार तर स्टँप वर लिहून द्या - अण्णासाहेब दराडे
-----------------------------------------------
लाईट बंद करून शेतकरी पुत्राला थांबवणे शक्य नाही. बॅट जनसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचली आहे - अण्णासाहेब दराडे
News धाराशिव आवाज दि.१५ ( तुळजापूर प्रतिनिधी)
महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाचे उमेदवार आपल्या आपल्या परीने उजनी धरणातील पाणी जिल्ह्यात आणण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत असून त्यांनी डिसेंबर महिन्यापर्यंत पाणी आणून दाखवावे तसे असेल तर ते त्यांनी स्टॅम्प बॉण्ड वरती लिहून द्यावे अशी खोचक टीका तिसऱ्या आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी केली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर ती लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे दोन्ही उमेदवार लोकांना उडणीच्या पाण्याची आमिष दाखवत असून या पाण्यावरती निवडणूक जिंकण्यासाठी ते उतावळे झाले आहेत. मात्र जनतेला माहिती आहे. की, उजनीचे पाणी हे डिसेंबर पर्यंत येणार नाही. तसे असेल तर त्यांनी स्टॅम्प वरती लिहून द्यावे. मात्र ते स्टॅम्प वरती लिहून देणार नाहीत याची खात्री आहे. ही निवडणूक होईपर्यंत ते उजनीच्या पाण्याचा प्रश्न बोलती व त्यानंतर पुढील पाच वर्ष हा प्रश्न कोणीही मार्गी लावणार नाही असे. कणखर बोल तिसऱ्या आघाडीचे शेतकरी पुत्र उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी केले आहे. 
----------------------------------------------------------
# झंझावात कायम -
पूर्ण विधानसभा मतदारसंघांमध्ये अण्णासाहेब दराडे यांचा झंजावात सध्या जोरात असून प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा, तळागाळापर्यंत पोहोचलेले बॅट चिन्ह आणि जनसामान्यातून मिळत असलेला प्रतिसाद यामुळे अण्णासाहेब दराडे यांना रोखणे महायुती व महाविकासाकडे यांना अवघड जाणार आहे. 
-----------------------------------------------------------
# लाईट बंद -
तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे अण्णासाहेब दराडे यांची सभा चालू असताना लाईट बंद करण्यात आली.यावेळी अण्णासाहेब दराडे यांनी लाईट बंद असतानाही आपले भाषण चालू ठेवले. लोकांना सांगितले की, मागील एप्रिल महिन्यापासून मी ज्या ज्या गावी जातो. त्या त्या गावी लाईट बंद करण्याचे काम हे सत्ताधारी करत असल्याचे सांगितले. लाईट बंद करून शेतकरी कुत्र्याचा आवाज दाबणे शक्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अण्णासाहेब दराडे यांची बॅट आता जनसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचली आहे.