उमरगा तालुका धनगर समाजाचा दसरा मेळावा
संपन्न मोठया उत्साहात साजरा;
--------------------------------------------
मराठवाडा ही राजकीय पिकांसाठी सुपिक जमीन : ॲड अविनाश धायगुडे
News धाराशिव आवाज (दि.१५)
मराठवाडा ही राजकीय पक्षांसाठी सुपीक जमीन असून कोणत्या भागावर सत्तेची कोणती बीजे पेरायची आणि पिकवायची यांचे नियोजन सध्या राजकारणी करीत आहेत. तेंव्हा समाजाने पर्यायाने युवकांनी अशा कोणत्याही फसव्या राजकीय आमिषांना बळी न पडता घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी तसेच आपला सत्तेतील वाटा विचारण्यासाठी करण्याचे आवाहन ॲड. अविनाश धायगुडे यांनी केले. धायगुडे हे धनगर समाजाच्या दसरा मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी) : बिरूदेव मंदिर उमरगा येथे रविवारी (ता. १३) रोजी उमरगा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर. डी. शेंडगे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध युवा वक्ते ॲड. अविनाश धायगुडे होते. यावेळी डॉ. विजयकुमार बेडदुर्गे, डॉ. विक्रम जीवनगे, प्रा. मधूशंकर टिळे, संपादक झटिंग म्हेत्रे, प्रा. डॉ. महेश मोटे, सरपंच शिवाजी सुरवसे, प्रा. अशोक दुधभाते, कमलाकर मोटे, कालिंदा घोडके, युवराज जोगी, मदन रेनगडे पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
मेळाव्यानिमित्त पुढे बोलताना ॲड. धायगुडे म्हणाले की, माधव फार्म्यूला राबविण्यात आला पण फार्म्यूला मधील "ध" कुठंय ? "मा" आणि "व" चा विकास झाला तर मग "ध" चा सत्तेतून लोप कसा पावला याचा विचार युवकांनी करावा. ज्या धनगर समाजाची संपूर्ण कुंडली ही इतिहास घडविणारी असताना त्या समाजाचा युवक संघटीत होवून व्यवस्थेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी उभे राहिले पाहिजे याचे दाखले देत सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या पासून मल्हारराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांचा पराक्रम समोर मांडला. युवकांना दिशाहीन बनवून पोळी भाजणाऱ्या पक्षांवर व नेत्यांवर धायगुडेंनी हल्लाबोल केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परळीचे तानाजी शास्त्री यांनी केले. सूत्रसंचालन शाहूराज हुलगे तर आभार गुंडू दूधभाते यांनी मानले. यावेळी शिवाजी बुवा गावडे, भीम सोनटक्के, कमलाकर मोटे, मधूशंकर टिळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राघवेंद्र गावडे, जालिंदर सोनटक्के, राजू धनकटे, गोविंद घोडके, बालाजी घोडके, सुनंदा भुरे, ज्योती बनसोडे, तानाजी घोडके, विकास दूधभाते
आदिंनी परिश्रम घेतले. तालुक्यातील विविध गावातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.