--------------------------------------
तिसऱ्या आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता..!
News धाराशिव आवाज
तुळजापूर विधानसभेच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.२४) आपल्या मोजक्याच कार्यकर्ते समवेत दाखल केला. विधानसभेच्या रिंगणात महाविकास आघाडी व महायुती विरुद्ध तिसऱ्या आघाडीचा सक्षम उमेदवार म्हणून अण्णासाहेब दराडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच अण्णासाहेब दराडे यांनी प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची पुणे भेट घेतली होती. त्यानंतर जवळपास तिसऱ्या गाडी काढून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. त्यामुळे अण्णासाहेब दराडे यांना तिसऱ्या आघाडी कडून उमेदवारी मिळाल्यास महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराला फटका बसून अण्णासाहेब दराडे हे तिसऱ्या आघाडीचे सक्षम उमेदवार म्हणून जनतेसमोर राहणार आहेत.
यावेळी न्युज धाराशिव आवाजशी बोलताना अण्णासाहेब दराडे म्हणाले की,आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली.मात्र आजही खेडे गावात,तांडे,वस्त्यावरती जाण्यासाठी नीट रस्ते नाहीत.मुलांना चांगली शिक्षण मिळत नाही.वेळेवर बस गावात येत नाही.चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत.खरंच आपण या स्वतंत्र भारतात राहतो का ? असा प्रश्न कधी कधी मला पडतो.आपण या राज्यकर्त्यांना मतदान करतो हे राज्यकर्ते निवडून आले की पुढच्या निवडणुकीपर्यंत खेडेगावाकडे,वस्तीकडे पाहत नाहीत. गावातील जनता अनेक अडचणींना संकटात असते त्यावेळी राज्यकर्ते मोठ्या शहरांमध्ये निवांतपणे राहत असतात. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला शेतकरी पुत्र आहे या सर्व समस्यांची जाण मला आहे त्यामुळे येत्या काळात आपण सर्वांनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.पुढील काळात आपण या सर्व समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची त्यांनी आश्वासित केले.